विजेची गरज नसणारा मातीचा फ्रिज पाहिलात का?

 विजेची गरज नसणारा मातीचा फ्रिज पाहिलात का?




गुजरातचे मनसुखभाईं प्रजापती यांनी मातीपासून या मस्त फ्रिजची निर्मिती केली आहे. 'मिट्टीकुल' या त्यांच्या कंपनीमार्फत ते हा फ्रिज विकतात. या फ्रिजला चालवण्यासाठी विजेची गरज नाही त्यामुळे तुम्हाला वीजबिलाची चिंता करण्याची गरज नाही. यामध्ये ठेवलेले अन्न ताजे राहते आणि अन्नाच्या चवीतही बदल होत नाही. सामान्य माणसासाठी आणि पर्यावरणप्रेमींसाठी हे अगदी उपयोगाचे उपकरण आहे. 


हे फ्रिज फार सोप्या तत्वावर कार्य करते. ज्याप्रमाणे माठामध्ये ठेवलेले पाणी थंड राहते, त्याप्रमाणे यामधील अन्न थंड राहते. या फ्रिजच्या वर एक चेंबर आहे ज्यामध्ये प्यायचे पाणी आपण भरू शकतो. हेच पाणी फ्रिजच्या बाजूने खाली टपकते आणि आतून उष्णता काढून बाष्पीभवन होते, ज्यामुळे चेंबर्स थंड राहतात. पिण्याच्या वापरासाठी चेंबरच्या पुढील खालच्या टोकाला एक लहान नळ दिला आहे. खालच्या कप्प्यात अन्नसामुग्री ठेवण्यासाठी दोन कपाट दिलेले आहेत. पहिल्या कप्प्याचा वापर भाजीपाला, फळे इत्यादी साठवण्यासाठी केला जाऊ शकतो आणि दुसरा कप्पा दूध इत्यादी साठवण्यासाठी वापरता येतो. थंड आणि परवडणारे, अन्न, भाज्या आणि दूधदेखील नैसर्गिकरीत्या दिवसभर ताजे ठेवण्यासाठी हा मातीचा रेफ्रिजरेटर एक चांगला पर्याय आहे.


तुम्हाला हा फ्रिज 'मिट्टीकुल' च्या संकेतस्थळावर विकत घेता येईल, अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा




No comments:

Powered by Blogger.